पनवेल/कळंबोली (गणेश लाड)- कळंबोली येथील KL -1,सेक्टर -5E आणि आसपासच्या परिसरात दूषित व गढूळ, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त महिलांनी सौ.स्नेहल बागल(जिल्हा सचिव, मनसे) यांच्या नेतृत्वाखाली आज सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
शनिवार पासून सुरू असलेल्या अपुऱ्या व घाणेरड्या,गढूळ पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून लोकांना पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे पाणी पुरवठा होत नाही.गढूळ व दुर्गंधी युक्त पाण्याच्या बाटल्या दाखवत, ह्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत सौ स्नेहल ताई बागल यांनी सिडको पाणी पुरवठा अभियंता श्री प्रफुल देवरे यांना धारेवर धरले आणि संध्याकाळ पर्यंत पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा व नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
आज संध्याकाळ पर्यंत स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन सिडको पाणी पुरवठा अभियंता श्री प्रफुल देवरे साहेब यांनी संतप्त नागरिकांना दिले आहे. परंतु असे न झाल्यास उद्या कळंबोली मधील महिलांचा विराट हंडा मोर्चा सिडको ऑफिस कार्यालयात घेऊन जाणार आहोत असे सौ. स्नेहल ताई बागल यांच्या कडून सांगण्यात आले आहे.




