मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसमोरील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत साखर उद्योगाच्या सध्याच्या अडचणी, त्यामागील कारणे आणि भविष्यातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तामामा भरणे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, तसेच राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, आमदार दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आणि प्रकाशसिंह सोळंके उपस्थित होते.
या बैठकीत साखर कारखान्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी कर्ज पुनर्गठन (Debt Restructuring), इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविणे, तसेच उद्योगाला स्थैर्य देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. साखर उद्योग अधिक सक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांवर विचारमंथन झाले.
बैठकीदरम्यान संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यातील साखर उद्योगाला बळकटी देण्यासाठी पुढील काळात ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











