रायगड-पनवेल (ता.प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण ६३,७८२ महिलांनी ई-केवायसी पूर्ण केल्याचे नोंदवले गेले असले तरी तांत्रिक त्रुटींमुळे अनेक प्रक्रिया अपूर्ण अथवा चुकीच्या ठरल्या आहेत.
सध्या तब्बल २२,३७५ महिलांनी अद्याप ई-केवायसी पुन्हा पूर्ण केलेली नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी संबंधित लाभार्थींना ३१ मार्च २०२६ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
तालुकानिहाय प्रलंबित प्रकरणे पुढीलप्रमाणे:
अलिबाग – २,६३३
कर्जत – १,९६२
खालापूर – १,७७२
महाड – १,६५६
माणगाव – १,७९९
म्हसळा – ८०८
मुरुड – ७१३
पनवेल – ५,१४०
पेण – १,५३३
पोलादपूर – ४२७
रोहा – ८४४
श्रीवर्धन – ७८७
सुधागड-पाली – ४८९
उरण – १,३७६
तळा – ४३६
सन २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण व स्वावलंबन वाढवणे हा आहे. मात्र, ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास लाभ बंद होऊ शकतो, याची नोंद घेण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ई-केवायसी करताना अडचणी आल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.











