पालिका प्रशासनाचे सक्त निर्देश
पावसाळा सुरू होण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना आतापर्यंत केवळ १० टक्के नालेसफाई झाली आहे. यामुळे कामाचा वेग वाढवून ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करा, अन्यथा दंड आणि कारवाई होईल, असा इशारा पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना दिला आहे.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज शहर पावसाळा पूर्व आढावा बैठक घेतली. यामध्ये शहरातील कामांचा आढावा घेतला. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ/एमएमआरडीए कार्यालयापर्यंत जाऊन उद्यान येथे मिठी नदी, तरळीत नेहरू विज्ञान केंद्र आदी ठिकाणी नालेसफाईची पाहणी केली. तसेच नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
— असे होणारे काम —
▪ पालिकेने यावर्षी पावसाळ्याआधी ४९९.०९ मैट्रिक टन गाळ उपसण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
▪ आतापर्यंत ४६४५६.१७ मैट्रिक टन केवळ ८.८० टक्केच गाळ काढण्यात आला.
▪ सखल भागात पाणी साचण्याचा धोका टाळण्यासाठी साफसफाई वेळेत करण्याचे आदेश.








