आजचा दिवस घारेवाडी येथील आदिवासी वस्तीतील सर्वसामान्य, कष्टकरी बांधवांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. जंगलाशी, निसर्गाशी नातं जपून, रोजंदारी मजुरी व शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या मेहनती आदिवासी बांधवांनी एकत्र येत, #मासंतोषदादाबांगरसाहेब यांच्या विकास निधीतून मंदिराचे सभामंडप उभारले आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून हनुमान जयंतीच्या पवित्र दिवशी कलशारोहणाचा मंगल कार्यक्रम साजरा केला.
*घारेवाडी ही आदिवासी वस्ती…अतिशय दुर्गम, सुविधांपासून वंचित… पण मनाने अत्यंत श्रीमंत! अनेक अडचणी, संघर्ष सहन करत ही माणसं आजही आपली परंपरा, संस्कृती आणि एकोप्याची परंपरा जपून आहेत. अशा या वस्तीमध्ये पहिल्यांदाच आपल्या *कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. संतोष दादा बांगर साहेब* येणार होते; मात्र काही वैयक्तिक कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत.
तरीही त्यांच्या जागी त्यांचे बंधू, *हिंगोली शहराचे लोकप्रिय #नगराध्यक्षमाश्रीरामदादाबांगर_साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून या आदिवासी बांधवांच्या आनंदात सहभाग घेतला. त्यांची ही उपस्थिती म्हणजे केवळ भेट नव्हे, तर आदिवासी समाजाच्या भावना ओळखणाऱ्या, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या खऱ्या लोकप्रतिनिधीचे जिवंत उदाहरण आहे.
ज्या वस्तीपर्यंत आजवर साधा पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्यही पोहोचला नाही, त्या ठिकाणी एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी हजेरी लावली—ही बाब खरोखरच प्रेरणादायी आहे. या वस्तीमध्ये केवळ ५०–१०० मतदार असले, तरी इथली माणसं प्रेम, आपुलकी आणि निसर्गाशी जुळलेली आहेत. हीच त्यांची खरी ओळख आणि ताकद आहे.
आज संख्या कमी असली, तरी उद्या हीच आदिवासी बांधवांची ताकद हजारोंच्या बळाने तुमच्या पाठीशी उभी राहील, याची मी खात्री देतो.
दादा, तुम्ही अशाच प्रकारे या दुर्गम आदिवासी भागातील बांधवांच्या अडीअडचणी समजून घेत, त्यांना मायेचा हात देत राहा—हीच अपेक्षा!
तुमच्या या मनापासूनच्या उपस्थितीबद्दल मनःपूर्वक आभार आणि खूप खूप कौतुक! 🙏
आपलाविश्वासू
बबनगारूळे
( शिवसेना सिद्धेश्वर सर्कल)


