एकीकडे सिंहस्थ कुंभ मेळ्याचा निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू असून स्मार्ट सिटीच्या नावाने करण्यात आलेल्या अनेक कामांवर पुन्हा खर्च करून सर्वसामान्यांच्या पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप ॲड.सुरेश आव्हाड यांनी केला आहे..
सिंहस्थ कुंभमेळ्याचा निधी हा शाश्वत कामांवर खर्च व्हायला हवा, कायमस्वरूपी नाशिककराना दोन वेळेस मुबलक पाणीपुरवठा व्हायला हवा.शहरात नव्याने सरकारी दवाखाने विकसित करायला हवे. शहरातील विजेचा प्रश्न गंभीर असून छोट्या मोठ्या पावसात विद्युत पुरवठा खंडित होत असतो, त्यासाठी उपाय योजना व्हायला हव्यात.शहरात पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी याचे नियोजन व्हायला हवे.अनेक अंगणवाड्या, मनपा च्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यांना कायमस्वरूपी जागा देण्यात येवून पुनर्जीवित करायला हव्यात.
शहरातील अमरधाम मधील बेड मोडकळीस आलेले असून, अमरधाम मध्ये पाणी उपलब्ध नसणे,येथील विद्युत दीप जुने झालेले असल्याने रात्रीच्यावेळी अंतिमसंस्कार करताना अनेक अडचणी येत असतात.अमरधाम मधील रक्षा वाहून नेणाऱ्या नाल्या बंद असल्याने अनेकदा पहिल्या प्रेताची रक्षा उचलण्या आधीच दुसऱ्या प्रेताची रक्षा त्यात मिसळ ली जाते.अनेकदा दुसऱ्याच प्रेताच्या हस्ती घेऊन विसर्जन होत असते.यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने अशा अमरधाम वर सिंहस्थ कुंभ मेळ्याचा निधी खर्च करण्यात यावा.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी केली.
