अवैध्य धंद्यांचा सुळसुळाट, पोलिस अधिकाऱ्यांना हफ्त्यांमुळे आशिर्वाद!
अक्राणी प्रतिनिधी: कुंपणानेच शेत खाल्ले. भ्रष्टाचारी पोलिसांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे.पोलिसांच्या मदतीने अवैध धंद्यांना ऊत, गुन्हे तपासात निष्क्रियता, म्हणून पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा उपोषणकर्त्या श्रीमती सविता विजय वसावे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्या कडे केली आहे.
धडगाव पोलिस स्टेशन लागत १०० मीटरवर शासनाने बंदी घातलेले. मटका, व पत्त्याचा, फुद्दीचा, स्वतंत्र गल्लीत खुलेआम जुगार पोलिस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या आशीर्वादाने चालू आहे. यातून पोलिसांना लाखो रुपये मिळतात धडगाव बस स्थानकात अवैध्य प्रवासी वाहतूकची सुळसुळाट आहे. धडगाव पोलिस ठाणेत दिनांक १२/१२/२०२५ रोजी फिर्यादी सविता विजय वसावे यांच्या तक्रारीवरून खंडणी,सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण कायदा २०१६ अन्वये गुन्हा करण्यात आला आहे.सदरच्या गुन्ह्यात पोलिसांनी कायद्यानुसार कलमे लावले नाही. या गुन्ह्यात एकूण ६ आरोपी आहेत. पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपीला वाचवण्याचा उद्देशाने. ३(५)सामाईक इरादा . ६१(२)गुन्हा करण्याचा कट रचणे, २३८ पुरावा नष्ट करणे. तसेच सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण कायदा कलम ३ हे अती महत्वाचे कलम दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला शिक्षेपासून वाचवण्या करिता जाणीवपूर्वक कलमे लावले नाही. आरोपींवर ८ गुन्हे दाखल असताना त्याला वाचवण्यासाठी पूर्व अभिलेख कोर्टात न देता पोलिस न्यायालयाची सुद्धा दिशाभूल करतात. म्हणून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्या करिता दिनांक १०/०४/२६ पासून उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय शहादा येथे आमरण उपोषण छेडले आहे.
पोलीस अधिक्षक नंदुरबार, श्री. श्रवणकुमार एस. दत्त हे आल्यापासुन १००० पेक्षा अधिक गुन्हे ,अवैध दारू विकी, वाहतुक, निर्माती बाबत दाखल आहेत.नंदुरबार जिल्हयात सर्रासपध्दतीने मोठया प्रमाणात अवैध धंदे, अवैध गावठी हातभाट्टी दारू विकी, निर्माती व वाहतुक, भुमाफिया यांचे विरूध्द गुन्हे दाखल न करणे, गोर-गरिब लोकांना न्यायापासुन वंचितठेवणे, राजकिय वरदहस्त असलेले गुंडांना अभय देणे या विरोध्दात कायम सामाजिक जाणिव असलेले सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवित असल्याने तो आवाज दाबुन टाकण्यासाठी सदरह अप्रामाणिकरित्या, अवैध, बेकायदेशीर, बोगस, कायदयाचा सतत गैरवापर करून सामाजिक कार्यकर्ते यांचे विरूध्द खोटे गुन्हे दाखल करून हद्दपार सारखी गंभिर स्वरूपाची कार्यवाही सुरू करून त्रास देणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे, आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दूरूपयोग करून contact killer व भ्रष्ट पद्धतीने मनमानी कारभार करीत आहेत,असा आरोप आदिवासी महिलांनी केला आहे.
