समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, आणि दलित, पीडित, शोषित वर्गाचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज १६७ वी जयंती. या औचित्याने ‘योग न्यूज येवला’ परिवारातर्फे त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन.
शिक्षणाचे महत्त्व विषद करताना त्यांनी “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली…” या शब्दांत शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. त्यांचा हा विचार आजही आपल्याला दिशा देणारा आहे. शेतकऱ्यांचे कैवारी, महिला शिक्षणाचे पुरस्कर्ते,
आणि अस्पृश्यता व जातीभेदाविरुद्ध अविरत लढणारे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून “सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती” या विचारातून समाजाला नवी दिशा दिली.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक संघर्ष केले. त्यांचे विचार आणि कार्य आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या उभारणीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारसरणीवर आधारित समाज घडवणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. चला, या जयंतीनिमित्त आपण सर्व त्यांच्या कार्याचे स्मरण करूया आणि त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया.
✍ सारथी महाराष्ट्राचा
