वैजापूर (प्रतिनिधी : रवींद्र पवार)
वैजापूर तालुक्यातील चेंडू फळ येथे विश्वरत्न, महामानव बोधिसत्व पं. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
या गावात अनेक वर्षांपासून सर्व महापुरुषांच्या जयंती सर्व जाती-धर्मातील नागरिक एकत्र येऊन गुण्या-गोविंदाने साजरी करत असल्याचे विशेषत्वाने दिसून येते. बाबासाहेबांनी दिलेली समता, बंधुता आणि संविधानाची शिकवण या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करताना त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श हा फक्त शब्दांत न राहता आचरणात उतरवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. “बाबासाहेबांचा विचार जगणारा माणूसच खरा ज्ञानदाता ठरतो,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
जयंतीनिमित्त गावातील सर्व अबालवृद्ध, युवक, माता-भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून सामाजिक एकात्मता व समरसतेचा संदेश देण्यात आला.









