महासागर प्रतिनिधी रिसोड
रिसोड तालुक्यातील रिठद येथील स्वामी समर्थ यांच्या केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १५ एप्रिल २०२६ रोज बुधवार ला सकाळपासूनच पुण्यतिथी निमित्त च्या कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. दरम्यान केंद्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुचरित्र पारायण व पारायणाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक सेवेकरी भक्तांनी पारायणाला बसून पारायण केले. केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण पोथी वाचून पारायण केले. या सप्ताहाच्या कालावधीमधील रोजचा दिनक्रम असा आहे सकाळी ७.३० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, सकाळी ८ वाजता भूपाळी आरती, सकाळी ८.३० ते १०.३० दरम्यान सामूहिक गुरुचरित्र वाचन, त्याच वेळी यज्ञ मंडपात प्रातिनिधिक स्वरूपात सेवेकऱ्या
कडून नित्य स्वाहाकार, सकाळी स
१०.३० वाजता नैवेद्य, सकाळच्या ३ आरत्या मंत्रपुष्पांजली व प्रार्थना सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत विशेष याग दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत भोजन आणि विश्रांती दुपारी २ ते ६ पर्यंत स्वामी चरित्र सारामृत व श्री दुर्गा सशक्त वाचन, आवर्तन रुद्र अध्याय व ग्राम नागरी अभियान १८ विभागाचे मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ ते ६.३० दरम्यान औदुंबर प्रदक्षिणा ६.३० वाजता नैवेद्य व संध्याकाळच्या सर्व पुष्पांजली, नित्यध्यान, गीताई, मनाचे श्लोक, गीतेचा पंधरावा अध्याय, पसायदान, विष्णुसहस्त्रनाम, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सप्ताह मध्ये दिनांक ९ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान साजरा केला. आणि सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत या सप्ताहाची स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखीच्या माध्यमातून प्रदक्षिणा घालून सांगता करण्यात आली. या पालखीमध्ये अनेक महिला पुरुष भक्त सहभागी झाले होते. श्री स्वामी समर्थांची पालखी घेऊन महिला वारकरी झाल्या. व नंतर सर्व सेवेकऱ्यांना व इतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.









