आज बुधवार दिनांक 15-4- 2026 रोजी शिरदवाड ग्रामपंचायत मध्ये पानंद रस्ते बाबत बैठक आयोजित केले होते.
पाणंद रस्ते बाबत ग्रामपंचायत अधिकारी श्री.माळी यांनी शासन निर्णयाचे वाचन करून त्याची सविस्तर माहिती दिली, तसेच ग्राममहसूल अधिकारी श्री.आवळे यांनी काम कशा प्रकारे होणार, प्रत्येक विभागाची जबाबदारी काय असणार याची हि माहिती दिले. श्री.रणजित दादा कदम यांनी सर्व रस्ते होणार असून याचा लाभ शेतकरी यांनी घेणे बाबत सांगीतले.
व ऐन वेळी आलेले पत्र पंचगंगा नदी प्रदूषणा बाबत 17-04-2026 रोजी 11 गाव बंद करण्याचं प्रस्ताव श्री.महादेव कुंभार यांनी वाचन केले असता त्याला उपस्थित ग्रामस्थानी पाठिंबा दर्शवला.
शेवटी पंचायत समिती उपसभापती सौ मनीषाताई रणजित दादा कदम यांनी पाणंद रस्ते हा शेतकऱ्याचा श्वास आहे, आणि शेती करण्यासाठी शेतात ट्रॅक्टर, रोटावेटर, मळणी मशीन, व पिकवलेला माल बाजार पेठेत नेण्यासाठी रस्ता हा महत्वाचा आहे, तरी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता या योजनेचा लाभ घ्यावे, व अतिक्रम धारक यांनी आपले अतिक्रमण काढून प्रशासनास सहकार्य करावे असेही मत व्यक्त केले. शेवटी आभार प्रदर्शन श्री.आशुतोष पाटील यांनी केले.
यावेळी बैठकीस शिरदवाड मधील सर्व ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील बैठकीस पंचायत समिती उपसभापती सौ मनीषाताई कदम , सरपंच तथा प्रशासक सौ सुजाता मारुती कोळी, ग्रामपंचायत अधिकारी श्री.विजय माळी, ग्राम महसूल अधिकारी श्री. आवळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.महादेव कुंभार,श्री.रणजित दादा कदम, कदमअण्णा सोसायटीचे विद्यमान चेरमन अभिजित पाटील, संचालक विश्र्वास पाटील. अमोल पाटील, श्री. आशुतोष पाटील , तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.











