कल्याण :- कल्याण मध्ये अत्यंत धक्कादायक सायबर गुन्ह्याची घटना समोर आली आहे. ‘पहलगाम हल्ल्या’चा धाक दाखवत सायबर भामट्यांनी ८२ वर्षीय आजींना ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल ७३.३० लाख रुपयांना गंडा घातला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला ‘तपास अधिकारी’ असल्याचे भासवून आजींना फोन केला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी पाकिस्तानी दहशतवाद्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक आढळल्याचा बनाव करत त्यांनी आजींमध्ये भीती निर्माण केली.यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’ असल्याचे सांगत, पाच दिवस सतत फोनवर संपर्क ठेवून मानसिक दबाव टाकण्यात आला.
बँक व्यवहारांची तपासणी सुरू असल्याचे कारण देत आरोपींनी आजींना RTGS आणि ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास भाग पाडले.या प्रकारात एकूण ७३.३० लाख रुपये टप्प्याटप्प्याने उकळण्यात आले.या प्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे
श्रीकांत रा धोकटे
(ठाणे शहर लोकप्रतिनिधी)











