जत / प्रतिनिधी.
ज्यांनी ज्यांनी भगवंताला जवळ करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली हे जरी खरे असलेतरी शेवटी त्यांना भगवंत भेटलेच व भगवंत भेटीने त्यांचे जिवन धन्य झाले असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तन व प्रबोधनकार ह. भ. प. श्री. संस्कार महाराज खंडागळे ( पंढरपूर ) यांनी केले.
ते येथील छत्रपती शिवाजीराजे नगर येथील श्री. स्वामीसमर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने श्री. स्वामीसमर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात प्रबोधन करीत होते.
श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या, १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री. स्वामी समर्थ मंदिरावर आकर्षक अशी विधुत रोषनाई करण्यात आली होती. मंदिराचा गाभारा विविध फुलांनी सजविण्यात आला होता.
पुण्यतिथीनिमित्त श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पहाटे अभ्यंग स्नान घालून अभिषेक पूजा व आरती करण्यात आली.
त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तन व प्रभोधनकार ह. भ. प. श्री.संस्कार महाराज खंडागळे यांच्या कीर्तनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रबोधन करताना महाराज पुढे म्हणाले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत अनेक संत होऊन गेले. त्यांनी आपला संसार सोडून परमात्म्याच्या भेटीच्या ओढीने जगनिंदा सहन केली.
जगतगुरू श्री. संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर,संत सखुबाई, संत चॊकामेळा,संत मीराबाई, संत जनाबाई, संत एकनाथ, संत नामदेव आदी संतांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी जगनिंदा सहन केली त्यानंतरच त्यांची आणी भगवंतांची भेट झाली असेही महाराज म्हणाले.
श्री. स्वामी समर्थ महाराज हे देह सोडून जरी गेले असलेतरी भक्तांच्या हाकेला ते धावून येतात याची प्रचिती अनेक भक्तांना येत असून आपले जे काही आहे ते सर्व काही आपले नसून ते स्वामींचे आहें अशी भावना ज्या भक्तांची आहे. अशा भक्तांच्या आयुष्यात स्वामी काहीही कमी पडू देत नाहीत त्यामुळे सर्वांनी स्वामी नामाचा गजर केला पाहिजे असेही महाराज म्हणाले.
श्री. स्वामी समर्थ चारिटेबल ट्रस्ट जत हे विविध उपक्रम राबवित असून या ट्रस्टच्या माध्यमातून लवकरच वारकरी शिक्षण संस्था व अन्नछत्र व सभागृह बांधण्यात येणार असून या पवित्र कार्यास स्वामी भक्तांनी व समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन ही संस्कार महाराज यांनी केले.
दुपारी एक वाजता श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रींची आरती होऊन श्री. स्वामी चरणी पुष्प अर्पण करण्यात येऊन त्यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या वेळी शशिकांत काळगी, इंजि. विश्वनाथ शिंदे, माजी प्राचार्य वसंतराव बोराडे,सुभाष हातेकर( सांगोला ), दिनराज वाघमारे,प्रतीक अंकलगी,आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, शहाजीबापू भोसले, सतीश चव्हाण ( मिस्त्री ),अतुल मोरे,दीपक पाटणकर, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे, गणेश सावंत, मोहन पवार, समर्थ पवार,सदाशिव जाधव आदींनी सहकार्य केले.
पुण्यतिथी निमित्त पहाटेपासूनच स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी दिसून येत होती यामुळे संपूर्ण परिसर स्वामीमय झाला होता.








