कन्नड (प्रतिनिधी) : “कामचुकारपणा अजिबात चालणार नाही, तो सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा Vinay Gowda यांनी कन्नड येथे घेतलेल्या आढावा बैठकीत दिला.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दौऱ्यादरम्यान ‘जनता दरबार’ भरवून नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, गटविकास अधिकारी रामावट, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा पुस्तक देऊन सत्कारही करण्यात आला.
या दौऱ्यामुळे कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून प्रशासन अधिक सक्रिय होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.








