पिंपलोद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपलोद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी फुले-शिव-शाहू-आंबेडकरी विचारवंत प्रा. संदीप पांडेकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व, सामाजिक समतेची गरज आणि शिक्षणाचे महत्त्व यावर सखोल प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार मनोभावे ऐकले.
कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य वायझाडे सर, भोरे सर, जगदीश कांबे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक ठरले.
या व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा अधिक बळकट होण्यास मदत झाली.









