• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरीत तापमानाचा पारा चढला; उष्माघाताचा धोका वाढला, नागरिकांनी घ्यावी काळजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाथरीत तापमानाचा पारा चढला; उष्माघाताचा धोका वाढला, नागरिकांनी घ्यावी काळजी
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

पाथरी/प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यासह पाथरी परिसरात सध्या तापमानात झपाट्याने वाढ होत असून उष्माघाताचा धोका तीव्र झाला आहे. वाढत्या उष्णतेमागे ‘एल निनो’ (El Niño) या जागतिक हवामान प्रक्रियेचा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पॅसिफिक महासागरातील तापमानवाढीमुळे वाऱ्यांच्या प्रवाहात बदल होत असून, याचा परिणाम भारतातील हवामानावर होत आहे.

RelatedPosts

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान

या बदलामुळे पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता असून, मे महिन्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उष्माघाताचा धोका वाढला
सध्या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि उन्हात काम करणारे मजूर विशेषतः धोक्यात आले आहेत. डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा, बेशुद्धावस्था, घाम न येणे व त्वचा कोरडी पडणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.

“रुग्णांसाठी २४ तास तयारी” – डॉ. जनार्दन गोळेगावकर
पाथरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर यांनी सांगितले की, उष्माघाताच्या रुग्णांसाठी रुग्णालयात २४ तास उपचार सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. चार स्वतंत्र बेड, कुलर व आवश्यक वैद्यकीय साधनसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाचा सल्ला
आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करत दिवसातून भरपूर पाणी पिणे, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बाहेर जाणे टाळणे, सैल व सुती कपडे वापरणे, तसेच ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

प्राण्यांचीही काळजी घ्या
उष्णतेमुळे रस्त्यावरील प्राणीही त्रस्त होत असून नागरिकांनी त्यांच्या साठी पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहून आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे असून, सजगता हाच उष्माघातापासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

वीज लपंडावाने रिसोडकर हैराण; उकाड्यात नागरिकांची गैरसोय वाढली

Next Post

पाथरीत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहाला गती; ‘संकल्प’च्या पाठपुराव्याला यश

Related Posts

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही
ताज्या घडामोडी

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

June 5, 2026
8
कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका
ताज्या घडामोडी

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

June 5, 2026
55
पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान
ताज्या घडामोडी

पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान

June 5, 2026
16
जप्त केलेल्या हातगाड्या व टपऱ्या दंडाशिवाय परत द्या; विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक निलेश पवार
ताज्या घडामोडी

जप्त केलेल्या हातगाड्या व टपऱ्या दंडाशिवाय परत द्या; विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक निलेश पवार

June 4, 2026
483
महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर
ताज्या घडामोडी

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

June 2, 2026
50
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 2, 2026
45
Next Post
पाथरीत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहाला गती; ‘संकल्प’च्या पाठपुराव्याला यश

पाथरीत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहाला गती; ‘संकल्प’च्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

June 5, 2026
हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

June 5, 2026
किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

June 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In