श्रीगोंदा : प्रतिनिधी
कर्मवीर विद्याप्रबोधिनी, सातारा यांच्या वतीने आयोजित सन २०२५-२६ मधील रयत प्रज्ञाशोध (RTS) परीक्षेत श्रीगोंदा येथील श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील पाच विद्यार्थिनींनी सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिष्यवृत्ती मिळवत संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे.
यशस्वी विद्यार्थिनींमध्ये कु. स्वरा विलास शेळके (१५८ गुण), कु. समर्था सुनील खामकर (१५४ गुण), कु. भूमी दिनकर भुजबळ (१५० गुण), कु. स्नेहा शंकर बोनगे (१४४ गुण) आणि कु. स्वराली हंबीर म्हस्के (१४२ गुण) यांचा समावेश आहे.
या सर्व विद्यार्थिनींना विभागप्रमुख सचिन गारुडकर, कुंदन खामकर, मिलिंद काळे, जयश्री कुदांडे, किरण कोकणी व विठ्ठल होले यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळूंजकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा भोईटे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, गुरुकुलप्रमुख किरण शिंदे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.











