मुंबई, कांदिवली (प्रतिनिधी) :
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील पत्रकार, साहित्यिक, गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना ‘साहित्य रत्न विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
हा राज्यस्तरीय पुरस्कार समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट यांच्या वतीने अक्षय तृतीया निमित्त दि. १९ एप्रिल २०२६ रोजी कांदिवली पूर्व येथील अशोक सावंत सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान
भारत कवितके यांनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले असून त्यांच्या ‘सांज’, ‘शोधतो मी किनारा’, ‘आकाश तारकांचे’, ‘अरे मी एकटा’, ‘मी एक वृत्तपत्र लेखक’, ‘माझ्या गावाच्या दिशेने’, ‘मनातल्या चारोळ्या’, ‘चांदण्यांना रोज सांगतो’ अशा एकूण नऊ पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. तसेच ‘इश्कात रात रंगली’ हा लावणी संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.
संगीत व साहित्य क्षेत्रातही सक्रिय
त्यांच्या १६ गाण्यांचे युट्यूबवर प्रकाशन झाले असून रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
११६८ पुरस्कारांनी सन्मानित
भारत कवितके यांना आतापर्यंत तब्बल ११६८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथेही त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. विविध वृत्तपत्रांमधून त्यांच्या बातम्या, लेख, कविता, कथा आणि चारोळ्या सातत्याने प्रसिद्ध होत असतात.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास मिनाक्षी पाखरे, अलका नाईक, अशोक मोहिते, रामकृष्ण कोळवणकर, रावसाहेब घोडेराव, मंगेश नाईक, संगीता वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप रासकर यांनी प्रभावी आणि मनोरंजक सूत्रसंचालन केले.
या पुरस्कारामुळे भारत कवितके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.










