• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बांधकाम कामगारांची फसवणूक उघड; फॉर्ममध्ये मुद्दाम चुका करून पैशांची उकळपट्टी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
बांधकाम कामगारांची फसवणूक उघड; फॉर्ममध्ये मुद्दाम चुका करून पैशांची उकळपट्टी
0
SHARES
182
VIEWS
Ad 1

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचण्याऐवजी दलाल आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमतातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी केला आहे. रावेर, जामनेर, अमळनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील कामगारांना नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेत प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यातून आर्थिक शोषण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

माहितीनुसार, कामगारांची नोंदणी दलालांमार्फत केली जात असून प्रत्येकाकडून ₹1000 ते ₹2000 पर्यंत अवैध वसुली केली जाते. याहून गंभीर बाब म्हणजे फॉर्म भरताना मोबाईल क्रमांक, आधार, बँक खाते व वारसांची नावे यामध्ये जाणूनबुजून चुका केल्या जातात. नंतर या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा पैसे उकळले जातात. बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करूनही साध्या दुरुस्तीसाठी 5 ते 6 महिने लागतात, तर दलालांना ₹500 ते ₹800 दिल्यास अवघ्या 10 मिनिटांत काम पूर्ण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शासनाने तालुका स्तरावर सुविधा केंद्रे उभारून कर्मचारी नेमले असतानाही कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने त्यांना वारंवार जळगाव येथे फेऱ्या माराव्या लागत आहेत. परिणामी अनेक कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित राहिल्या असून चुकीच्या माहितीमुळे शासकीय योजनांचा लाभ अडकून पडला आहे.

या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावरच दुरुस्तीचे अधिकार देणे, दलालांविरोधात कठोर कारवाई करणे, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणे, प्रक्रियेला निश्चित कालमर्यादा देणे व संपूर्ण यंत्रणा पारदर्शक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत, मंडळाच्या सचिवांच्या निषेधार्थ त्यांच्या खुर्चीला पैशांचा हार घालण्याचाही इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: dnyaneshwar sawle
Previous Post

धानोरा गावच्या प्रथम सुनबाईची पोलिस दलात भरारी; पुनम मोरे यांची ठाणे शहर पोलीस शिपाईपदी निवड

Next Post

जनार्धन वाघमारे यांचे निधन

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post
जनार्धन वाघमारे यांचे निधन

जनार्धन वाघमारे यांचे निधन

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In