• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीज बिल भरूनही अंधाराचा त्रास; प्रभाग ३ नागरिकांचा महावितरणविरोधात ३० एप्रिल रोजी मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
वीज बिल भरूनही अंधाराचा त्रास; प्रभाग ३ नागरिकांचा महावितरणविरोधात ३० एप्रिल रोजी मोर्चा
0
SHARES
38
VIEWS
Ad 1


पाथरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील शिवाजीनगर, शाहूनगर, नेताजीनगर, ओंकारनगर, शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांनी वीज बिलांचा १०० टक्के भरणा करूनही सतत वीज खंडित होणे, लो व्होल्टेज आणि अपुरी वीज सेवा यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे सांगितले आहे. पाणीपुरवठा सुरू होताच वीज गायब होण्याची समस्या गंभीर बनली असून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरात २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अलोक चौधरी यांच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक पार पडली. या बैठकीत ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोर्चाची सुरुवात शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरातून होणार असून तो बळवंत वाचनालय मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थेट महावितरण (MSEB) कार्यालयापर्यंत जाईल. तेथे नागरिकांकडून निवेदन देण्यात येणार आहे.

या बैठकीत नागरिकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये पुढील मागण्या समाविष्ट आहेत:

  • डीपीवरील वाढता लोड तात्काळ कमी करणे
  • सर्व डीपींची क्षमता वाढवणे
  • शिवाजीनगर व जाधव डीपी 100 KVA वरून 200 KVA करणे
  • शिक्षक कॉलनीतील डीपीची तातडीने देखभाल (मेंटेनन्स) करणे
  • बळवंत वाचनालय परिसरात नवीन डीपी बसविणे
  • सर्व वीज लाईनवर AB स्विचेस बसविणे
  • प्रभाग ३ मध्ये २० नवीन विद्युत पोल उभारणे
  • फ्युज कॉलसाठी संपर्क क्रमांक सार्वजनिक करणे
  • वीज खंडित झाल्यास राज्य वीज आयोगाच्या नियमानुसार प्रति तास ₹50 नुकसानभरपाई देणे

नागरिकांचे म्हणणे आहे की, वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असून, विशेषतः विद्यार्थ्यांचे अभ्यास आणि घरगुती कामे अडचणीत येत आहेत.

या आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, संपूर्ण प्रभागातील नागरिकांना कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“बिल भरूनही सेवा नाही” या तीव्र नाराजीतून नागरिक एकवटले असून, ३० एप्रिलचा मोर्चा महावितरण प्रशासनासाठी निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

शहादा शहरात डासांचा कहर; नागरिक त्रस्त, पालिकेची युद्धपातळीवर फॉगिंग मोहीम सुरू

Next Post

सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभ व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
19
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभ व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभ व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In