• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीज बिल भरूनही अंधाराचा त्रास; प्रभाग ३ नागरिकांचा महावितरणविरोधात ३० एप्रिल रोजी मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
वीज बिल भरूनही अंधाराचा त्रास; प्रभाग ३ नागरिकांचा महावितरणविरोधात ३० एप्रिल रोजी मोर्चा
0
SHARES
38
VIEWS
Ad 1


पाथरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील शिवाजीनगर, शाहूनगर, नेताजीनगर, ओंकारनगर, शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांनी वीज बिलांचा १०० टक्के भरणा करूनही सतत वीज खंडित होणे, लो व्होल्टेज आणि अपुरी वीज सेवा यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे सांगितले आहे. पाणीपुरवठा सुरू होताच वीज गायब होण्याची समस्या गंभीर बनली असून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

RelatedPosts

हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न

पनवेलमधील वीज समस्येवर उच्चस्तरीय बैठक; उपमहापौर प्रमिला पाटील यांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन

पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन

या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरात २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अलोक चौधरी यांच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक पार पडली. या बैठकीत ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोर्चाची सुरुवात शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरातून होणार असून तो बळवंत वाचनालय मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थेट महावितरण (MSEB) कार्यालयापर्यंत जाईल. तेथे नागरिकांकडून निवेदन देण्यात येणार आहे.

या बैठकीत नागरिकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये पुढील मागण्या समाविष्ट आहेत:

  • डीपीवरील वाढता लोड तात्काळ कमी करणे
  • सर्व डीपींची क्षमता वाढवणे
  • शिवाजीनगर व जाधव डीपी 100 KVA वरून 200 KVA करणे
  • शिक्षक कॉलनीतील डीपीची तातडीने देखभाल (मेंटेनन्स) करणे
  • बळवंत वाचनालय परिसरात नवीन डीपी बसविणे
  • सर्व वीज लाईनवर AB स्विचेस बसविणे
  • प्रभाग ३ मध्ये २० नवीन विद्युत पोल उभारणे
  • फ्युज कॉलसाठी संपर्क क्रमांक सार्वजनिक करणे
  • वीज खंडित झाल्यास राज्य वीज आयोगाच्या नियमानुसार प्रति तास ₹50 नुकसानभरपाई देणे

नागरिकांचे म्हणणे आहे की, वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असून, विशेषतः विद्यार्थ्यांचे अभ्यास आणि घरगुती कामे अडचणीत येत आहेत.

या आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, संपूर्ण प्रभागातील नागरिकांना कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“बिल भरूनही सेवा नाही” या तीव्र नाराजीतून नागरिक एकवटले असून, ३० एप्रिलचा मोर्चा महावितरण प्रशासनासाठी निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

शहादा शहरात डासांचा कहर; नागरिक त्रस्त, पालिकेची युद्धपातळीवर फॉगिंग मोहीम सुरू

Next Post

सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभ व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

Related Posts

हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न
ताज्या घडामोडी

हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न

June 11, 2026
7
पनवेलमधील वीज समस्येवर उच्चस्तरीय बैठक; उपमहापौर प्रमिला पाटील यांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

पनवेलमधील वीज समस्येवर उच्चस्तरीय बैठक; उपमहापौर प्रमिला पाटील यांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन

June 11, 2026
6
पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन
ताज्या घडामोडी

पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन

June 11, 2026
11
जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

June 11, 2026
17
कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
ताज्या घडामोडी

कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

June 11, 2026
11
नवेगाव ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापनात अपयशी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
ताज्या घडामोडी

नवेगाव ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापनात अपयशी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

June 10, 2026
12
Next Post
सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभ व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभ व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त; चुकीच्या वीज बिलांबाबत चौकशीची मागणी

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त; चुकीच्या वीज बिलांबाबत चौकशीची मागणी

June 11, 2026
सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार; पुलावरील कठडे गायब, अपघाताचा धोका वाढला

सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार; पुलावरील कठडे गायब, अपघाताचा धोका वाढला

June 11, 2026
श्रीरामपूरातील कोचिंग क्लासवर कारवाईची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना रिपाईचे निवेदन

श्रीरामपूरातील कोचिंग क्लासवर कारवाईची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना रिपाईचे निवेदन

June 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In