• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“जनतेचा खरा आवाज विधान परिषदेत पोहोचवण्यासाठी सईद भैय्या खान यांना संधी द्या”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
“जनतेचा खरा आवाज विधान परिषदेत पोहोचवण्यासाठी सईद भैय्या खान यांना संधी द्या”
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

शिवसेना पदाधिकाऱ्यांची जोरदार मागणी

पाथरी (प्रतिनिधी) –

राज्याच्या राजकारणात तळागाळातील प्रश्न जाणणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेशी घट्ट नाळ जोडलेल्या नेतृत्वाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असताना, शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान यांचे नाव विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पुढे येत आहे. त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सईद भैय्या खान यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून आरोग्य, शिक्षण आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरजू व वंचित घटकांना मदत केली आहे. “आश्वासनांपेक्षा कृतीला प्राधान्य” ही त्यांची कार्यशैली असून, अनेकांच्या समस्या त्यांनी प्रत्यक्ष मार्गी लावल्या आहेत.

त्यांची ‘२४ तास जनतेसाठी उपलब्ध’ अशी ओळख निर्माण झाली असून, कोणत्याही नागरिकाचा प्रश्न असो, तातडीने प्रतिसाद देऊन तो सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात त्यांचा भक्कम जनसंपर्क तयार झाला आहे.

युवकांच्या रोजगार, शिक्षण आणि मार्गदर्शनाच्या प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. अनेक युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले असून, त्यांना दिशा देण्याचे कार्य केले आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची समन्वयवादी भूमिका ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी ताकद मानली जाते.

पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि जनाधार या बळावर सईद भैय्या खान हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहेत. त्यामुळे विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर त्यांची निवड झाल्यास अल्पसंख्याक, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय यांसारख्या ज्वलंत विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेकडून सईद भैय्या खान यांना विधान परिषदेची उमेदवारी देणे ही काळाची गरज असल्याचे मत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Previous Post

गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या आगमनानिमित्त शिर्डीत भव्य लोककला महोत्सव

Next Post

प्रा. रमेश भुजबळ यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
प्रा. रमेश भुजबळ यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ उत्साहात संपन्न

प्रा. रमेश भुजबळ यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In