एरंडोल (प्रतिनिधी) : रा. ति. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत कामगारांच्या योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्य प्रांगणात “वंदे मातरम्”, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या सामूहिक गायनाने करण्यात आली. यानंतर मुख्य लिपिक श्रीकांतभाऊ बिर्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कामगारांचे हक्क, त्यांची मेहनत आणि समाजातील त्यांचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी यांनी आपल्या भाषणात कामगारांचे योगदान समाज आणि देशासाठी अत्यंत अनमोल असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी काबरे, उपाध्यक्ष ॲड. महेशजी काबरे, सचिव राजीवजी मनियार, उपसचिव धीरजजी काबरे, संचालक परेश भाऊ बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुख्याध्यापक एस. एस. राठी, उपमुख्याध्यापक पी. एच. नेटके, पर्यवेक्षक पी. एस. नारखेडे व एम. एम. राठी, रा. ही. जाजू विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. ए. चौधरी सर व प्रा. एस. एस. महाजन यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.






