वर्धा (प्रतिनिधी) : इयत्ता १२ वी (HSC) परीक्षा २०२६ च्या निकालात वर्धा जिल्ह्यातील कु. मिस्बा नियाजी फातिमा हिने विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने तब्बल ९५.६७ टक्के गुण मिळवत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
इुतामा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाची ही गुणवंत विद्यार्थिनी असून तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर तिने हे यश मिळवले.
आपल्या यशामागे पालकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि स्वतःची मेहनत यांचा मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी करण्याचा तिचा मानस असल्याचेही ती म्हणाली.
कु. मिस्बा नियाजी फातिमा हिच्या या यशामुळे इुतामा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयासह संपूर्ण वर्धा जिल्ह्याचा गौरव वाढला असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






