यवतमाळ (प्रतिनिधी) : बारावी परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील किमया शितल वातीले हिने घवघवीत यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे तिने 600 पैकी 600 गुण मिळवत अभूतपूर्व कामगिरी केली आहे.
किमयाच्या या ऐतिहासिक यशाची दखल विविध माध्यमांनी घेतली असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळविल्याचे किमयाने सांगितले.
तिच्या या यशामुळे केवळ यवतमाळच नव्हे, तर संपूर्ण राज्याचा नावलौकिक वाढला आहे. विद्यार्थ्यांनी तिच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करावेत, असे मतही व्यक्त होत आहे.
किमया वातीले हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून “सारथी महाराष्ट्राचा”च्या वतीनेही तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.








