खटाव (प्रतिनिधी):
आंबवडे गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. शोभा दत्तात्रय काकडे यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महिलांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणाऱ्या, तडफदार आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव पुढाकार घेणाऱ्या सरपंच म्हणून त्यांची ओळख होती. ग्रामविकासासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून, गावाच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा होता.
त्यांच्या जाण्याने आंबवडे गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
👉 समस्त आंबवडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.






