केळाच्या गाड्याडून टोपल्या वाल्यांवर अन्याय?
बीड नगरपरिषद व वाहतूक शाखेच्या माध्यमातून बीड शहरामध्ये पाठीमागील काही दिवसांपासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे या सुरू असलेल्या मोहिमेचे स्वागतच आहे कारण या मोहिमेमधून बीड शहर व शहरातील नागरिक वाहतूक कोंडी पासून मोकळा श्वास घेणार आहेत तर किरकोळ अपघाताची प्रकरणे देखील या कारवाईमुळे संपुष्टात येणारे असून या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
याच कारवाईच्या पार्श्वभूमीवर मात्र बीड नगर परिषदेकडून दुटप्पी भूमिका घेतली जाऊ लागली आहे हे आता लपून राहिलेले नाही कारण भाजी मंडई परिसरामध्ये बीड शहराच्या परिसराला लागून असलेल्या खेडेगावातील भाजीपाला विक्रेते शेतीमध्ये पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी सदरील परिसरामध्ये बसत आलेले आहेत परंतु काल बीड नगर परिषदेने केलेली अतिक्रमणाची कारवाई ही कुठल्यातरी मत्सरातून केलेली पाहायला मिळाली कारण त्याच परिसरामध्ये अगदी रस्त्यावर केळीची व फळाची गाडे थाटून बसलेल्या विक्रेत्यांवर मात्र बीड नगरपरिषद कोठेतरी बोटचेपीची कारवाई करताना आढळून आली.
स्वर्गीय अजित दादा पवार यांचा वैचारिक वसा व वारसा चालवताना विजय राजे पंडित यांची टीम काल फेल ठरताना आढळून आली असे बोलले तरी वावगे ठरणार नाही कारण एकाच कारवाईमध्ये एका विशिष्ट गटाला वेगळी वागणूक तर दुसऱ्या गटाला वेगळी वागणूक असा प्रकार काल या अतिक्रमणाच्या कारवाईतून पुढे आला व या दुटप्पी भूमिकेच्या कारवाईचा काल लोकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला तर राजे तुमच्या प्रशासकीय राज्यामध्ये हा काय नंगानाच असा देखील सवाल सदरील भाजीपाला विक्रेत्यांकडून व ग्राहकांकडून करण्यात आला.
अतिक्रमानाची कारवाई करायचीच होती तर त्यांनी समांतर बाजूने करणे अपेक्षित होते परंतु असे न होता आपला तो बाबू आणि दुसऱ्याच ते कार्ट असा कारवाईचा प्रकार काल बीड नगर परिषदेने केला व या कारवाईच्या नावाखाली कुठला हेतू त्यांनी साध्य केला हे त्यांनाच ठाऊक असून फळ विक्रेत्यांचा मताकडे पाहून कारवाईची काठी उगरली गेली नाही?का असा देखील सवाल कालच्या अतिक्रमणाच्या कारवाईनंतर समोर येणार आहे तर बीड शहरामध्ये सत्तेत विराजमान असलेल्या अनेक राज्यकर्तेचे अनाधिकृत बांधकामे आहेत तेथे कारवाई करत बीड नगरपरिषद पुरुषार्थ सिद्ध करणार का? असा देखील संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे.








