जालना जिल्हा प्रतिनिधी संजीव पाटील । जालना जिल्ह्यातील तलाठी महसूल अधिकारी सजेवर न थांबल्यास होणार शिस्त भंगाची कार्यवाही जालना जिल्हाधिकारी सौ.आशिमा मित्तल यांचे आदेश। जालना जिल्ह्यातील तलाठी नेमणूक असलेल्या गावातील सजेवर न थांबल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.ज्या ठिकाणी कार्यालय बांधकाम नसल्यास ग्रा.प.कार्यालयात थाब़ण्याचे आदेश.
जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.खाजगी कार्यालय भाड्याने घेण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक. सजेवर थांबण्याचा वार दिनांक किती तास स्पष्ट ठळकपणे बोर्ड लावण्यात यावा .वरील प्रमाणे आदेश देण्यात आले असून जिल्हा अधिकारी आशिमा मित्तल यांनी काढलेल्या परी पत्रकात म्हटले आहे. तलाठी नेमणूक असलेल्या गावात न जाता शहरात कार्यालय भाड्याने घेतले असुन सोयीच्या ठिकाणी कार्यालय भाड्याने घेऊन रहात होते.शेतकरी यांना भेटण्यासाठी भाडे खर्च करून जावे लागत होते. अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.











