• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

करमाळा ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठ्याचा लपंडाव; ग्राहकांमध्ये तीव्र संताप

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
करमाळा ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठ्याचा लपंडाव; ग्राहकांमध्ये तीव्र संताप
0
SHARES
4
VIEWS
Ad 1


ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या कमालीच्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना, अनेक भागांत रोजच वीजपुरवठ्याचा सततचा लपंडाव सुरू असल्याने वीजग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजसेवेचा फटका घरगुती ग्राहकांसह व्यापारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही बसत आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक


वीजग्राहकांना सुरळीत सेवा देण्यात अपयशी ठरत असतानाच, महावितरणकडून पेपरलेस व कॅशलेस व्यवहारांसारखे सामान्य, अडाणी ग्राहकांना न समजणारे नियम कार्यान्वित केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना ऑनलाईन व्यवहारांची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच, मागील वीजबिल भरून ४५ ते ५० दिवस उलटल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “एकीकडे सुरळीत सेवा मिळत नाही, तर दुसरीकडे कठोर नियम लादले जात आहेत,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.


याबाबत बोलताना काही नागरिकांनी शासनव्यवस्थेवरही तीव्र टीका केली. “लोकशाही राज्याच्या नावाखाली हुकूमशाही व्यवस्थेकडे वाटचाल सुरू असून, सामान्य जनतेची सर्वच क्षेत्रांत पिळवणूक होत आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, “अन्यायाविरोधात सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवला नाही, तर ही मनमानी आणि अनागोंदी व्यवस्था कायम राहील. ‘तुम लढो… हम कपडे सांभालेंगे!’ ही जनतेची उदासीन मानसिकता बदलली नाही, तर ही हुकूमशाही पद्धतीची व्यवस्था अधिकच बळकट होत जाईल,” असेही मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, सततच्या वीजखंडित प्रकारामुळे नागरिकांनी महावितरणने तातडीने योग्य नियोजन करून अखंडित वीजपुरवठा करावा, तसेच सर्वसामान्य ग्राहकांना समजेल अशा सुलभ पद्धतीने सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.

Tags: Suhas Deokar
Previous Post

शहादा तालुका सेवानिवृत्तांच्या बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी शरद धारू पाटील यांची बिनविरोध निवड.

Next Post

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; रेल्वे स्टेशनवरील वडापाव आणि समोसा महागला

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
मुंबईकरांच्या खिशाला कात्री; रेल्वे स्टेशनवरील वडापाव आणि समोसा महागला

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; रेल्वे स्टेशनवरील वडापाव आणि समोसा महागला

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In