श्रीगोंदा तालुक्यात खळबळ
एरंडोली गावात कुकडी कालवा फोडून पाईपद्वारे पाण्याची चोरी !
श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावच्या हद्दीत शासकीय मालमत्तेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करून पाण्याची बेकायदेशीर चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे
येथील कुकडी डाव्या कालव्याच्या तळापासून थोडे वरच्या भागात सात ते आठ पाईप टाकून त्या पाइपावाटे पाणी चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे
उन्हाळ्याचे तीव्रतेमुळे आधीच कुकडी प्रकल्पतर्यादित पाणी साठा शिल्लक आहे .अशा परिस्थितीत सोडण्यात आलेल्या आवर्तनातून अशा प्रकारे उघडपणे पाणी चोरी होत असल्याने ,कालव्याच्या शेवटच्या (टेल) भागातील शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे
या प्रकाराणे प्रामाणिक शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.
आता पाणी सुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहा खाली पाईप झाकले गेल्यामुळे आता पाईप दिसत नसले तरी आमचे प्रतिनिधीने पाणी नसताना जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता पाईप दिसत आहे.
या फोडलेल्या एकाच वेळी एका ठिकाणी दोन व दुसऱ्या ठिकाणी पाच पाईप टाकून त्या पाइपावाटे अमाप पाणी शेततळे ,शेतीला दिले जात आहे.
खरेतर ज्या शेतकऱ्यांच्या कालव्यात जमिनी गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पाणी भेटत नाही अशी लगतच्या शेतकऱ्यांची व्यथा आहे.
या चोरीच्या पाण्याला जबाबदार कोण अशी नागरिकांमधून चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर शोध घेऊन दोषींवर नियमानुसार कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .









