• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केंद्राने नव्हे थेट.. युनेस्कोने घेतली अहिराणी भाषेची दखल

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
केंद्राने नव्हे थेट.. युनेस्कोने घेतली अहिराणी भाषेची दखल
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

खान्देशी अस्मितेचा विजय; अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय पाठबळ

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

| प्रतिनिधी अमर पठारे

खान्देशच्या मातीत रुजलेली आणि लाखो लोकांच्या बोलीत जिवंत असलेली अहिराणी भाषा आता थेट जागतिक पातळीवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून युनोच्या युनेस्को संस्थेने अहिराणी भाषेची अधिकृत दखल घेत गौरवपत्र पाठविले आहे. त्यामुळे संपूर्ण खान्देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगातील विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यासाठी कार्य करणाऱ्या युनेस्को संस्थेने अहिराणी भाषेच्या जतनासाठी सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, “पहिले विश्व अहिराणी सम्मेलन” आणि अहिराणी साहित्यिकांच्या चळवळीचीही नोंद घेण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आणि अनेक अहिराणी साहित्यिक गेल्या अनेक वर्षांपासून अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने लढा देत आहेत. या लढ्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने अहिराणी भाषेच्या भविष्यासाठी नवी आशा निर्माण झाली आहे.

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले की, “युनेस्कोने घेतलेली ही दखल म्हणजे संपूर्ण खान्देशासाठी अभिमानाची बाब आहे. अहिराणी ही फक्त बोली नसून ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे.”

दरम्यान, केंद्र सरकारचे भारतीय बोलीभाषा संवर्धन कार्यालय बंगळुरू येथे कार्यरत असून त्या कार्यालयाच्या अधिकारी श्रीमती काटजू यांनीही अहिराणी सम्मेलनाची विशेष नोंद घेतली आहे.

अहिराणी भाषेतील लोककथा, भारुडे, ओव्या, लोकगीतं आणि ग्रामीण संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आता नव्या जोमाने प्रयत्न सुरू होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

“एक भाषा… एक अस्मिता… एक संघर्ष…”

अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सुरू असलेली चळवळ आता अधिक वेगाने पुढे जाणार असून खान्देशातील तरुणांमध्येही याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Tags: Amar Pathare
Previous Post

“संतुलित खत वापर जागरूकता अभियान”

Next Post

हर्णे मारहाण प्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
हर्णे मारहाण प्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

हर्णे मारहाण प्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In