• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जालना एमएमएलपीत पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे आगमन;मराठवाड्यात लॉजिस्टिक क्रांतीची नांदी

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
जालना एमएमएलपीत पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे आगमन;मराठवाड्यात लॉजिस्टिक क्रांतीची नांदी
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

जालना, दि.27 (जिमाका): जिल्ह्याच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा महत्त्वपूर्ण मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क (एमएमएलपी) अर्थात ड्राय पोर्ट प्रकल्पात 25 मे 2026 रोजी पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे यशस्वी आगमन झाले. या पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वागत केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जालना ड्रॉयपोर्टचे व्यवस्थापक विकास मलिक यांच्यासह अधिकारी आणि उद्योजकांची उपस्थिती होती.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक


यामुळे जालना आणि संपूर्ण मराठवाडा विभागात रेल्वे-संलग्न मालवाहतूक सेवांची औपचारिक सुरुवात झाली आहे.पहिली इनबाउंड कंटेनर रेक ‘पोलाद स्टील’ कंपनीसाठी स्पंज आयर्न घेऊन एमएमएलपी जालना येथील रेल्वे सायडिंगवर दाखल झाली. या यशस्वी ट्रायलमुळे उद्योगांसाठी रेल्वे, रस्ता आणि बंदर यांचा समन्वय साधणाऱ्या एकात्मिक मल्टी मॉडेल मालवाहतुकीची नवी दारे खुली झाली आहेत.
विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स व्यवस्थापन लिमिटेड (NHLML) या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीमार्फत आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला हा देशातील पहिलाच ड्राय पोर्ट/मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क प्रकल्प आहे. “महाराष्ट्र एमएमएलपी प्रायव्हेट लिमिटेड” (MMPL) या विशेष उद्देश वाहन (SPV) अंतर्गत हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या ‘पीएम गतिशक्ती’ आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होणे, मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढणे, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होणे, कार्बन उत्सर्जनात घट आणि इंधन बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत मालवाहतूक व्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे 64.51 एकर क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच, आयात-निर्यात (EXIM) व्यवहारांसाठी आवश्यक असलेली सीमाशुल्क विभागाची वैधानिक मान्यता देखील या प्रकल्पाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता जालन्यासह मराठवाड्यातील उद्योगांना थेट आयात-निर्यात माल हाताळणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.


एमएमएलपी जालना प्रकल्पामुळे मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून, अंतर्गत महाराष्ट्रातील निर्यात-आयात व्यापाराला नवी गती मिळेल. जालना ते जेएनपीए बंदर तसेच राष्ट्रीय लॉजिस्टिक्स कॉरिडॉरशी थेट जोडणी झाल्याने उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
या प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी भारतीय रेल्वे, सीमाशुल्क विभाग, महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणा तसेच संबंधित सर्व भागधारकांनी केलेल्या समन्वित प्रयत्नांचे जालना जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे.
पहिल्या ट्रायल कंटेनर रेकच्या यशस्वी आगमनामुळे जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा विभागात लॉजिस्टिक-आधारित औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
–––––––

Previous Post

कारंजा तालुक्यातील ६० ग्रामपंचायती प्रशासकाविना; विकासकामे ठप्प असल्याची नागरिकांची नाराजी

Next Post

ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी डांगे यांचे निधन

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी डांगे यांचे निधन

ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी डांगे यांचे निधन

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In