कामठी (नागपुर) स्थित रहिवासी चंद्रशेखर अरगुलेवार हे
(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सन 1993 मध्ये रूजू झाले. समाज सेवेची आवड असल्याने त्यांना त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी CISF अंतर्गत राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडीसा
आणि मुंबई येथे आपली सेवा दिलेली आहे. मार्च 2017 मध्ये त्यांनी स्वैच्छिक सेवा निवृत्ती घेवून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यांच्या या सामाजिक कार्याला पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची समर्थ साथ लाभते आहे.
याच कारणाने ते या सामाजिक कार्यात तग धरुन आहेत. कुठलेही सामाजिक कार्य करणे हे आजच्या परिस्थितीत सोपे काम राहिलेले नाही. ते ही स्वतःच्या योगदानाच्या भरवश्यावर !
सन 2017 मध्ये त्यांनी
‘ तेजस बहुउद्देशीय संस्था ‘ ची स्थापना करून तरूणांना निःशुल्क सैनिकी व पोलिस प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत अनेक तरूणांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. या सोबतच त्यांनी मागील सहा वर्षांपासून सर्व धर्मीय वर-वधू सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांचे वरती संत गाडगेबाबा महाराजांचा प्रभाव पडला आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात याचा प्रभाव दिसून येतो आहे. ही कौतुकास्पद बाब ठरते आहे. ‘ आधी केले, मग सांगितले ‘ असा त्यांचा स्वभाव आहे.
त्यांच्या अथक परिश्रमाने शास्त्री चौक, कामठी येथे ‘ तेजस बहुउद्देशीय संस्थेचे ‘ उदघाटन मा. महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते दिनांक 31 मे 2026 ला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या प्रसंगी माजी आमदार आशिष जैस्वाल, आशिष देशमुख आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील लोकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांनी केलेले आहे.
सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार, चंद्रपूर यांनी नुकतीच त्यांचे घरी सदिच्छा भेट दिली.
कामठी (नागपुर) स्थित रहिवासी चंद्रशेखर अरगुलेवार हे
(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सन 1993 मध्ये रूजू झाले. समाज सेवेची आवड असल्याने त्यांना त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी CISF अंतर्गत राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडीसा
आणि मुंबई येथे आपली सेवा दिलेली आहे. मार्च 2017 मध्ये त्यांनी स्वैच्छिक सेवा निवृत्ती घेवून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यांच्या या सामाजिक कार्याला पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची समर्थ साथ लाभते आहे.
याच कारणाने ते या सामाजिक कार्यात तग धरुन आहेत. कुठलेही सामाजिक कार्य करणे हे आजच्या परिस्थितीत सोपे काम राहिलेले नाही. ते ही स्वतःच्या योगदानाच्या भरवश्यावर !
सन 2017 मध्ये त्यांनी
‘ तेजस बहुउद्देशीय संस्था ‘ ची स्थापना करून तरूणांना निःशुल्क सैनिकी व पोलिस प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत अनेक तरूणांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. या सोबतच त्यांनी मागील सहा वर्षांपासून सर्व धर्मीय वर-वधू सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांचे वरती संत गाडगेबाबा महाराजांचा प्रभाव पडला आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात याचा प्रभाव दिसून येतो आहे. ही कौतुकास्पद बाब ठरते आहे. ‘ आधी केले, मग सांगितले ‘ असा त्यांचा स्वभाव आहे.
त्यांच्या अथक परिश्रमाने शास्त्री चौक, कामठी येथे ‘ तेजस बहुउद्देशीय संस्थेचे ‘ उदघाटन मा. महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते दिनांक 31 मे 2026 ला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या प्रसंगी माजी आमदार आशिष जैस्वाल, आशिष देशमुख आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील लोकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांनी केलेले आहे.
सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार, चंद्रपूर यांनी नुकतीच त्यांचे घरी सदिच्छा भेट दिली.











