अंबरनाथ : पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अंबरनाथ नगरपालिकेकडून नालेसफाईच्या कामांना वेग देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा तेजश्री करजुळे तसेच नगरसेवक उमेश पाटील यांनी प्रभाग क्रमांक २ मधील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच तातडीने नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली असून, साचलेला गाळ व कचरा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पावसाळ्यात कोणत्याही भागात पाणी साचणार नाही यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे यावेळी सांगण्यात आले.











