प्रतिनिधी :निकेश भिसे
खरीप हंगाम सन २०२५-२६ मधील सोयाबीन पीक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून जिंती गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री. प्रकाशराव (दादा) नारायणराव रणवरे यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
संदर्भ क्र. १ व २ मधील शासन निर्णय तसेच कृषी आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खरीप हंगाम सन २०२५-२६ मधील सर्वसाधारण गट पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच संदर्भ क्र. ३ व ४ नुसार राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये सोयाबीन पीक स्पर्धेत उत्कृष्ट उत्पादन,
आधुनिक शेती पद्धती व नियोजनबद्ध शेती व्यवस्थापनाच्या जोरावर श्री. प्रकाशराव (दादा) नारायणराव रणवरे यांनी तालुका स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिंती गावातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक व वैज्ञानिक शेती करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
श्री. प्रकाशराव (दादा) नारायणराव रणवरे यांचे जिंतीतील सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!











