*संघर्ष, सेवा आणि विश्वासाचा 15 वर्षांचा प्रवास! म्हणजे ” नंदनवन”
15 वर्षांचा विश्वास…
*संघर्ष, सेवा आणि विश्वासाचा 15 वर्षांचा प्रवास! म्हणजे ” नंदनवन”
- हॉटेल नंदनवन फॅमिली रेस्टॉरंट
2011 पासून अविरतपणे आपल्या सेवेत…
एक छोटंसं स्वप्न…आणि त्या स्वप्नाला ग्राहकांच्या प्रेमाची जोड मिळाली…अशा प्रकारे सुरू झाला “नंदनवन” चा प्रवास.
गेल्या अनेक वर्षांत खूप संकटं आली…परळी – अंबेजोगाई रस्त्याचे खोदकाम सुरू झाले,पूर्ण रस्ता तयार होण्यासाठी तब्बल 4 ते 4½ वर्षांचा काळ गेला.त्या काळात अनेक व्यवसाय बंद पडले…पण नंदनवन थांबलं नाही.
एकेकाळी या नंदनवनवर 21 ते 26 लोकांचा स्टाफ काम करत होता.अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या ठिकाणाशी जोडला गेला होता.रस्ता कामामुळे परिस्थिती कठीण झाली,तरीही ग्राहकांचा विश्वास आमच्या पाठीशी उभा राहिला.
रस्ता पूर्ण झाला…नंदनवन पुन्हा उभं राहत होतं…आणि अचानक 2022 मध्ये कोरोना महामारी आली.
व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत झाला…पण त्या कठीण काळातही नंदनवनने हार मानली नाही.
लोकडाउनचे सर्व नियम पाळत लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचे काम केले.कोरंटाईन असलेल्या अनेक लोकांपर्यंत अन्न पोहोचवलं.प्रवासात अडकलेल्या अनेक ड्रायव्हर बांधवांकडे खाण्यासाठी पैसे नव्हते…अशा कित्येक भुकेल्या लोकांना या नंदनवनने मोफत जेवण दिलं.
त्यातील अनेक जण नंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर“त्या वेळचे जेवणाचे पैसे” स्वतःहून देण्यासाठी परत आले…हीच आमची खरी कमाई.
2011 मध्ये जे ग्राहक नंदनवन वर येत होते,ते आजही आपल्या कुटुंबासोबत इथेच जेवण करतात…कारण हे फक्त हॉटेल नाही,तर माणुसकीची चव जपणारं एक घर आहे.
मालक नेहमी एकच गोष्ट म्हणतात —“आम्ही फक्त पैसे कमावण्यासाठी नंदनवन चालवत नाही…आम्ही अनेक भुकेल्या लोकांचा आत्मा इथे तृप्त केला आहे.”
आजही परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमी दरात आणि प्रेमाने जेवण देण्याची सेवा नंदनवन अखंड सुरू ठेवत आहे.
अखंड मेहनत आणि असंख्य आशीर्वादामुळे
हेच नंदनवन आता लवकरच “कात” सोडणार आहे…
ग्राहकांचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास यांच्या जोरावर लवकरच सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी सजलेले“नंदनवन” एका नव्या आणि भव्य स्वरूपात आपल्या सेवेत उभे राहणार आहे,असे नंदनवन चे मालक श्री. बिभीषण फड यांनी सांगितले.
तुमच्या प्रेमामुळेच…
नंदनवन आजही अभिमानाने उभं आहे.
एकदा नक्की भेट द्या…
हॉटेल नंदनवन फॅमिली रेस्टॉरंट
परळी – अंबेजोगाई रोड, परळी वैजनाथ, जि. बीड
“जेवनाणे फक्त पोट भरत नाही…ते माणुसकीही जिवंत ठेवतं.”











