लातूर-धाराशिव-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपमधील काही पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये असलेली नाराजी आता उघडपणे चर्चेत येऊ लागली आहे. या नाराजीचे मतदानात रूपांतर झाले, तर त्याचा फायदा महेश देशमुख यांना होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील निवडणुका या पक्षीय ताकदीपेक्षा वैयक्तिक संपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक समीकरणांवर अधिक अवलंबून असतात. त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष आणि नाराजी ही निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र, भाजपची संघटनात्मक ताकद आणि पक्ष नेतृत्वाचे प्रयत्न हे नाराजी दूर करण्यात कितपत यशस्वी ठरतात, यावरही निकालाची दिशा अवलंबून असेल.
👉 आता प्रश्न एकच…
भाजपमधील नाराजी महेश देशमुख यांच्यासाठी संधी ठरणार का? की पक्षनिष्ठा पुन्हा एकदा सर्व समीकरणांवर मात करणार?
याचे उत्तर मतपेटीतूनच मिळणार आहे!











