अहेरी | प्रतिनिधी
स्थानिक धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक, समाजसुधारक आणि जननायक Birsa Munda यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य Mahesh Wadhai, प्रा. Shyam Barse आणि प्रा. Vijay Urkude यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, धरती आबा म्हणून ओळखले जाणारे भगवान बिरसा मुंडा यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी संघर्ष केला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी उभारलेल्या उलगुलान (महाविद्रोह) चळवळीने आदिवासी समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.
९ जून १९०० रोजी त्यांचे निधन झाले असले तरी त्यांचे त्याग, शौर्य, नेतृत्व आणि समाजसेवेचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी भगवान बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








