कणकवली | प्रतिनिधी
तुळस गावात गेल्या महिनाभरापासून तलाठी उपलब्ध नसल्याने शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महसुली दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, शेतीसंबंधित कागदपत्रे तसेच इतर शासकीय सेवांच्या कामांमध्ये विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या Sujata Padwal यांनी तहसीलदार Omkar Otari यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तुळस गावासाठी तातडीने तलाठी नियुक्त करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी त्यांनी केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तलाठी अनुपस्थित असल्याने शासकीय दाखले, महसुली नोंदी, शेतीविषयक कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया रखडल्या आहेत. यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तुळस गावात नियमित तलाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सुजाता पडवळ यांनी केली.
यावेळी संतोष शेटकर उपस्थित होते. तुळस गावातील नागरिकांनीही प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त करत, लवकरात लवकर तलाठी नियुक्ती करून शासकीय सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.







