• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुक्यातील मौजे वाळणे ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत अनागोंदी व अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

नवेगाव ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापनात अपयशी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

वाळणे गावात सुमारे सात वाड्या-वस्त्या असून कायमस्वरूपी लोकसंख्या सुमारे ७०० आहे. मात्र एप्रिल व मे महिन्यात ही संख्या १५०० ते १८०० पर्यंत वाढते. गावासाठी तीन वर्षांपूर्वी जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे २८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असली तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, योजनेअंतर्गत गावात अर्धा इंच व एक इंच व्यासाच्या पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. मात्र साठवण टाकीतून पाणीपुरवठा करण्यासाठी आउटलेट पाइपचा वापर करण्यात येत असल्याने दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार आहे. तसेच योजनेची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतीकडेही उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दलित वस्तीत १५व्या वित्त आयोगातून ४५ हजार रुपयांच्या पाइपलाइन कामाची नोंद असली तरी प्रत्यक्षात ते काम जलजीवन मिशनमधून करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली असून त्यात केवळ दोन घरे व एका वस्तीसाठी दोन इंच व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येत असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संपूर्ण गावात लहान व्यासाच्या पाइपलाइन असताना दोन घरांसाठी मोठ्या व्यासाची पाइपलाइन देण्यामागील कारण स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच ही पाइपलाइन काही ठिकाणी सांडपाणी वाहणाऱ्या गटारातून टाकण्यात येत असल्याने भविष्यात गटारे साफसफाई करताना पाइपलाइनचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांनी जलजीवन मिशनच्या दोन्ही टप्प्यांतील कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्त्यालगतच्या गटारांवर टाकण्यात आलेले अनधिकृत भराव हटवून गटारे मोकळी करण्यात यावीत, जेणेकरून पावसाळ्यात शेतीचे नुकसान होणार नाही, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती तपासावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

पवईत हरिपाठातून घुमला भक्तिरंगाचा नाद; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदाराचे उपोषण

Related Posts

कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
ताज्या घडामोडी

कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

June 11, 2026
11
नवेगाव ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापनात अपयशी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
ताज्या घडामोडी

नवेगाव ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापनात अपयशी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

June 10, 2026
12
उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 9, 2026
34
विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात; अपघातग्रस्त शेतकरी रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य
ताज्या घडामोडी

विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात; अपघातग्रस्त शेतकरी रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य

June 9, 2026
18
केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न

June 9, 2026
38
जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय
ताज्या घडामोडी

जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय

June 9, 2026
188
Next Post
पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदाराचे उपोषण

पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदाराचे उपोषण

ताज्या बातम्या

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; १२.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

June 11, 2026
पाणीटंचाईवर उपाय म्हणून निर्गुणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

पाणीटंचाईवर उपाय म्हणून निर्गुणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

June 11, 2026
पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदाराचे उपोषण

पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदाराचे उपोषण

June 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In