भैरवनाथ आयटीआयमध्ये निरोप समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
कळंब :
वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कळंब येथे सन २०२४-२६ बॅचच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवार दि. १६ जून २०२६ रोजी उत्साहात पार पडला.
धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य सतीश मातने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसीलदार प्राजक्ता पाटील-साळुंखे तसेच लातूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. सुशील शेळके उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी बारावी टेक्निकल सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसेच महावितरण, धाराशिव येथे शिकाऊ उमेदवार म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी आणि उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही मनोगतात संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरज भांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक गिरीधर कवडे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास संस्थेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


