प्रतिनिधी :
सटाणा येथे ‘क्रांतिसूर्य’ महाराणा प्रताप उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या शौर्य, स्वाभिमान आणि इतिहासाच्या जाज्वल्य परंपरेला बळ देण्यासाठी समाजातील विविध स्तरातून सहकार्य केले जात आहे. अशाच प्रकारे समाजकार्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती हरि आण्णा जाधव यांनी उत्सवासाठी बहुमूल्य देणगी देत आर्थिक बळ पुरवले आहे.
आजच्या काळात “जगात कोणी कुणाला एक रुपयाची मदत करत नाही” अशी भावना अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र या पार्श्वभूमीवर गोरगरिबांसाठी कायम धावून जाणारे आणि समाजहितासाठी कटिबद्ध असलेले हरि आण्णा जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून सामाजिक जाणीव आणि उदात्त विचारांची प्रचिती दिली आहे. त्यांनी उत्सव समितीकडून पावती स्वीकारत या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
महाराणा प्रताप यांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तसेच राष्ट्रपुरुषांचा इतिहास आणि विचार युवकांनी जाणून घ्यावेत, या हेतूने त्यांनी दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आणि कौतुकास्पद मानले जात आहे. हरि आण्णा जाधव हे केवळ राजकीय किंवा सामाजिक नेतृत्व नसून समाजाची संस्कृती, इतिहास आणि परंपरा जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व असल्याचे यावेळी बोलताना अनेकांनी नमूद केले.
“इतिहास त्यांचाच घडतो, जे इतिहासाचा आणि राष्ट्रपुरुषांचा आदर करायला शिकतात,” अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
उत्सव समितीच्या वतीने हरि आण्णा जाधव यांचे अभिमानपूर्वक आणि मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, त्यांच्या पुढील सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
