सिंधुदुर्ग | दि. १८ जून (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार Narayan Rane यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना – भाग ३ (PMGSY-III) अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या १२ मोठ्या पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, यासाठी तब्बल ४७ कोटी ३६ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील रस्ते संपर्क अधिक सक्षम होणार असून, विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तालुकानिहाय मंजूर पुलांची माहिती
देवगड तालुका
- फणसगाव-महाळुंगे रस्ता (कि.मी. ६/२४०) येथे २४ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ७१.५८ लाख रुपये मंजूर.
दोडामार्ग तालुका
- पाडवे-कोलझर-कुंभवडे-पणतुर्ली रस्ता (साखळी २/५५०) येथे २२ मीटर पुलासाठी २ कोटी ७८.०५ लाख रुपये मंजूर.
- भेडेशी-खान्याळे-शिरंगे पुनर्वसन रस्त्यावरील सापुलासाठी ३ कोटी ४७.५८ लाख रुपये मंजूर.
कणकवली तालुका
- नाटळ ते रामेश्वर मंदिर ते थोरले मोहूळ खरातवाडी रस्ता (साखळी २+३७५) येथे २८ मीटर पुलासाठी ३ कोटी २९.१३ लाख रुपये मंजूर.
कुडाळ तालुका (सर्वाधिक ६ पूल मंजूर)
- झाराप रेल्वे स्टेशन ते साळगाव माणगाव रस्ता (साखळी ८/८८०) : ३० मीटर पूल – ३ कोटी ३८.१५ लाख रुपये
- झाराप रेल्वे स्टेशन ते साळगाव माणगाव रस्ता (साखळी ११/९६०) : २० मीटर पूल – २ कोटी २७.२५ लाख रुपये
- घावनळे-नाणेली-माणगाव रस्ता (साखळी ६/४५०) : १०५ मीटरचा मोठा पूल – १० कोटी ८२.८९ लाख रुपये
- घावनळे-नाणेली-माणगाव रस्ता (साखळी ४/६४०) : ३० मीटर पूल – ३ कोटी ३८.०७ लाख रुपये
- मुंबई-गोवा महामार्ग (NH-66) ते साळगाव माळा सावंतवाडी रस्ता (साखळी ०/५००) : ४० मीटर पूल – ३ कोटी ४४.४६ लाख रुपये
- मुंबई-गोवा महामार्ग (NH-66) ते साळगाव माळा सावंतवाडी रस्ता (साखळी ०/८६०) : ३० मीटर पूल – २ कोटी ४७.२१ लाख रुपये
मालवण तालुका
- आचरा-भगवंतगड रस्ता (साखळी ४/५००) येथे ६० मीटर पुलासाठी ६ कोटी ९०.५० लाख रुपये मंजूर.
सावंतवाडी तालुका
- बांदा फिश मार्केट-बांदेश्वर मंदिर ते सटमट डिंगणे रस्ता (साखळी १/४७०) येथे २४.०५ मीटर पुलासाठी २ कोटी ४१.७७ लाख रुपये मंजूर.
ग्रामीण विकासाला मिळणार गती
या सर्व पुलांची एकूण लांबी सुमारे ४७३ मीटर असून, या कामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यातील विकासासाठी दिलेला शब्द पाळत ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हा निधी मंजूर करून आणल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे. या पुलांच्या उभारणीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
