सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा; सुजयदादा विखे पाटील विचार मंचाचा स्तुत्य उपक्रम
चिचोंडी पाटील, दि. २२ जून २०२६ :
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिचोंडी पाटील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले. सुजयदादा विखे पाटील विचार मंच, चिचोंडी पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस १५ जून रोजी संपन्न झाला. यानिमित्त त्यांनी कार्यकर्ते व नागरिकांना वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते. बॅनरबाजी, फटाके, हारतुरे यांसारख्या दिखाऊ खर्चाऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजू घटकांना मदतीचा हात द्यावा, असा संदेश त्यांनी दिला होता.
त्यांच्या या सामाजिक विचारातून प्रेरणा घेत सुजयदादा विखे पाटील विचार मंचाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना शैक्षणिक साहित्य खरेदी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती करून गाव, समाज आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.
वाढदिवसासारखे वैयक्तिक कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत साजरे करण्याची गरज असून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच खरी समाजसेवा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी मार्केट कमिटीचे माजी संचालक बाजीराव हजारे, माजी सरपंच मनोज कोकाटे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अशोक कोकाटे, माजी सरपंच पांडुरंग ससे, माजी सरपंच अमोल कोकाटे, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस बबनराव शेळके, माजी उपसरपंच महेश जगताप, माजी उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे, माजी उपसरपंच महादजी कोकाटे, माजी चेअरमन राजेंद्र कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य दीपक हजारे, राम खराडे, शालेय समिती अध्यक्ष ह.भ.प. दिपालीताई कोकाटे, युवा नेते विजय गाडे, शैलेश पवार, अशोक खराडे, दीपक कांबळे, देविदास शेळके, अंबादास कोकाटे, महादेव हजारे, मयूर बोरा, शाम कोकाटे, सतीश कोकाटे, भाऊसाहेब वाडेकर, मनोज गाडेकर, सचिन खडके, दत्ता वाडेकर, संभाजी खडके, मोहन कोकाटे, दत्ता धलपे, मयूर पवार, प्रशांत दळवी, पावशे देवा, मुख्याध्यापक पाटील सर व सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
तसेच सुजयदादा विखे पाटील विचार मंचाचे पदाधिकारी, गावातील आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
