• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खिद्रापूरकरांचा २७ जूनपासून गावबंद आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 26, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

कुरुंदवाड : श्री कोपेश्वर मंदिर परिसरातील घरांवर व बांधकामांवर अतिक्रमणाचा ठपका ठेवून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेविरोधात खिद्रापूर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, २७ जूनपासून गावबंद आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला आहे.

RelatedPosts

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयानुसार, न्याय मिळेपर्यंत गाव बंद ठेवणे, पर्यटकांना प्रवेशबंदी करणे, श्री कोपेश्वर मंदिर बंद ठेवणे तसेच कोणतीही विकासकामे न करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

या संदर्भातील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कोल्हापूर, पुरातत्त्व विभाग, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच स्थानिक आमदार आणि खासदारांना देण्यात आल्या आहेत.

खिद्रापूर ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सांगितले की, येथील नागरिक अनेक पिढ्यांपासून या परिसरात वास्तव्यास असून त्यांच्या मालकी हक्काची कागदपत्रे, प्रॉपर्टी कार्ड आणि महसुली नोंदी उपलब्ध आहेत. तरीही काही घरांवर अतिक्रमणाचे आरोप करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे गावकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याचिकाकर्त्याने ग्रामस्थांची बाजू न ऐकता न्यायालयीन प्रक्रिया सुरू केल्याचे सांगत, गावकऱ्यांच्या वतीने सक्षम आणि अनुभवी विधिज्ञ नेमून न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, मंदिर परिसरात पुरातत्त्व विभागाकडून सुरू असलेल्या उत्खनन आणि इतर बांधकामांबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. संरक्षण भिंतीलगत करण्यात आलेल्या खोदकामामुळे मंदिराच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा दावा करत संबंधित कामांची चौकशी करून ती तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, २००५, २००६, २०१९ आणि २०२१ मधील महापुरामुळे गावाचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांची घरे पडल्याने नागरिकांनी नव्याने घरे बांधली. काही घरे शासनाच्या विविध योजनांमधून उभारण्यात आली असून काही घरे सलमान खान यांच्या सेवाभावी फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले.

शासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Previous Post

इचलकरंजी राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस जुने दानवाड ग्रामस्थांचा एकमुखी विरोध

Next Post

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

Related Posts

Blog

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026
26
Blog

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026
12
Blog

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026
5
Blog

धैर्यशील कदम यांनी विधान परिषद सदस्य म्हणून घेतली शपथ

June 26, 2026
6
Blog

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखाताई माळी यांची बिनविरोध निवड; सत्कार समारंभ उत्साहात

June 26, 2026
24
Blog

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

June 26, 2026
14
Next Post

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In