महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती; अधिकृत घोषणा २६ जानेवारी महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत. येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नवीन जिल्ह्यांची प्रस्तावित यादी आणि विभाजन भुसावळ (जळगाव)उदगीर (लातूर)अंबेजोगाई (बीड)मालेगाव (नाशिक)कळवण (नाशिक)किनवट (नांदेड)मीरा-भाईंदर (ठाणे)कल्याण (ठाणे)माणदेश (सांगली/सातारा/सोलापूर)खामगाव (बुलडाणा)बारामती (पुणे)पुसद (यवतमाळ)जव्हार (पालघर)अचलपूर (अमरावती)साकोली (भंडारा)मंडणगड (रत्नागिरी)महाड (रायगड)शिर्डी (अहमदनगर)संगमनेर (अहमदनगर)श्रीरामपूर (अहमदनगर)अहेरी (गडचिरोली)
इतिहास आणि पार्श्वभूमीमहाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, त्यावेळी राज्यात फक्त २५ जिल्हे होते. नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रशासनिक गरजांमुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. २०१४ साली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला होता. २०१८ मध्ये राज्य सरकारच्या समितीने २२ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता.
सध्याच्या प्रस्तावात त्यापैकी बहुतेक जिल्ह्यांचा समावेश आहे.उदगीर जिल्ह्याचे विशेष महत्त्वलातूर आणि नांदेड या जिल्ह्यांतील काही भाग एकत्र करून उदगीर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे. लोकसंख्या, प्रशासन आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने हा जिल्हा महत्त्वाचा ठरणार आहे.
Discussion about this post