

सकाळी ५:०० वा काकडा भजन,सकाळी ९:०० वा मिरवनुक सकाळी ११:०० वा अमृतेश्वर मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पडला दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत गुरुवर्य ह भ प गोरक्षनाथ महाराज यांचे अमृतवाणीतुन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी महाराजांनी चार चरनाचा अभंग तुम्ही विश्वनाथ । दीन रंक मी अनाथ ॥१॥कृपा कराल ते थोडी । पाया पडीलो बराडी ॥२॥ काय उणे तुम्हापाशी । मी तो अल्पचि संतोषी ॥३॥तुका म्हणे देवा । काही भातुके पाठवा ॥४॥
हा घेतला होता सोप्या भाषेत भावार्थ सांगीतला. हे देवा तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी तर दिन रंक अनाथ आहे हे विश्वनाथ मी तुमचा भक्त आहे. तुम्ही माझ्यावर थोडी का होईना दया करा देवा तुमच्या जवळ भक्तांना देण्यासाठी काय उणे आहे मी तर अल्प संतोषी आहे.
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मला तुम्ही काहीतरी प्रेमरुपी भातुके म्हणजे खाऊ पाठव असे थोडक्यात सांगीतले त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. याकार्यक्रमासाठी पंचकृषीतील भाविक भक्त मोठ्या संख्येंने उपस्थित होते. याप्रसंगी भाविकांमधे एकच चर्चा होती आमदार निधीतुन एखादा सभामंडम या ठिकाणी झाला पाहीजे त्याकरता लोकप्रतीनीधीनी लक्ष देण्याची गरज आहे.
अमृतेश्वर महादेव मंदिर परीसरात गर्दिचा महापुर जनु लोटला होता..
Discussion about this post