सध्या सांगली जिल्ह्यातील नवोदित उद्योजक लाभार्थी मंडळींना नवीनच समस्येला सामोरे जावे लागतं आहे जरी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून नवीन उद्योगउभारणीला हिरवा कंदील मिळाला तरी ही प्रकरणे पाठपुरवठा करण्यासाठी विविध बँके कडे वर्ग केली जातात जिल्ह्यातील विविध बँकाकडे ही प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने वर्ग होतात मात्र बँके मधील यंत्रणा ही प्रकरणे जलद गतीने मार्गी लावत नसल्याचे चित्र आहे नुकत्याच आमच्या हाती आलेल्या आकडेवारी नुसार कित्तेक बँकाकडे मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी लाभार्थी उद्योजकांना त्रास होत आहे आता नव्याने व्यवसाय सुरु करणारा उद्योजक लाभार्थी आय ती आर रिटर्न भरत असेल का ? तर बँकांकडून रिटर्न्स ची मागणी होत आहे. तर बचत गटांच्या कर्ज प्रकरणालाही बँकाकडून विलंब केला जातो. अवास्तव कागदपत्रांची मागणी करून लाभार्थी उद्योजकांची दोखेदुखी वाढवली जाते. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या बँकांच्या अधिकाऱ्यांना लाभार्थी उद्योजकांची प्रकरणे सत्वर मंजूर करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या होत्या मात्र अद्यापही बँक अधिकारी लाभार्थी उद्योजकांना किचकट प्रक्रियेमध्ये गुंतवून ठेवत आहेत. त्यामुळे काही लाभार्थी उद्योजकांचा हिरमोड झाला आहे. जर अशा प्रकारे बँकानी अडचणी निर्माण केल्या तर जिल्ह्यातील उद्योग वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











