जिल्ह्यामध्ये वीज वापर करूनही विद्युत देयकांची रक्कम न भरलेल्या ग्राहकांची संख्या दोन लाखांवर पोहोचली असून तब्बल २७ कोटींच्या घरात थकबाकीची रक्कम असल्याचे चित्र आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये ३ हजाराहून अधिक ग्राहकांची विद्युत जोडणी तोडली गेली असल्याचे महावितरणचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. ते म्हणाले जिल्ह्यातील सांगली शहर विभागात ४२ हजार ३३ ग्राहकांकडे ६ कोटी ५२ लाख रुपये तर सांगली ग्रामीण विभागात ४१ हजार ४८८ ग्राहकांकडे ३ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे. ईश्वरपूर विभागात ४४ हजार २८६ ग्राहकांकडे ७ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. कवठेमहांकाळ विभागात ३४ हजार ४६ ग्राहकांकडे ३ कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी रक्कम आहे. आणि विटा विभागात ४३ हजार १२ ग्राहकांकडे ५ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी रक्कम आहे. या सर्व थकबाकी रकमेमुळे महावितरणच्या सर्व खर्चाचे गणित बिघडते आहे नाईलाजास्तव आम्ही २ जहाजाराहून अधिक ग्राहकांची विद्युत जोडणी तात्पुरती खंडित केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. थकीत विद्युत देयकांचा भरणा करण्यासाठी ग्राहकांच्या सोयीसाठी आम्हीमार्च २०२६ पर्यंत शनिवारी रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळातही आमची सर्व विद्युत देयके भरणा केंद्र सुरु ठेवणार आहोत अजूनही ज्या थकबाकी दारांची विद्युत देयके प्रलंबित आहेत त्यानी त्वरित भरणा करावा आणि कटू प्रसंग टाळावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.











