मिरज हे ऐतिहासिक तसेच आरोग्य पंढरी अशी ओळख असणारे शहर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असणारे हे शहर तसेच याशहराला सांस्कृतिक परंपरेचा मोठा ठेवा आहे नटसम्राट बालगंधर्व यांनी आपल्या सांगीतिक आयुष्याची सुरुवात याच शहरातून केली. डॉ विल्यम वॉन्लेस यांनी रुग्णांसाठी पोषक असणारे हवामान ओळखून तत्कालीन मिशन रुग्णालयांची उभारणी केली. हजारो गोर गरीब रुग्णांवर या रुग्णालयामध्ये अगदी अल्प दरामध्ये उपचार व्हायचे या सर्व परंपरेला साजेसे कार्य गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ पद्मावती शांतीसेवा फौंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत होत आहे. प्रख्यात उद्योजक विवेक (बंडू) शेटे यांच्या दूरदृष्टीतून या संस्थेची उभारणी झाली आणि त्यांना उत्तम साथ दिली ती त्यांच्या सुविद्य पत्नी आणि नगरसेविका अपर्णा विवेक शेटे यांनी, आपण समाजाचे काही देणे लागतो हि भावना मनात ठेऊन त्यांनीकोरोना काळामध्ये हजारो कुटुंबाना मोफत धान्य किट चे वाटप केले मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना दिवाळी मध्ये फराळ वाटप केले ते नोकरी आजही अखंडित सुरु आहे. त्याच बरोबर तरुणांच्या आरोग्याच्या दृष्टीने मॉर्निग ग्रुप ची स्थापना केली. तसेच गेली वीस वर्षे फौंडेशन मार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते यामधून शेकडो रक्ताच्या बाटल्यांचे संकलन होत असते. जेष्ठांसाठी दार वर्षी मोफत आरोग्य शिबिरे भरवली जातात. या शिबिरांमधून सर्व प्रकारच्या तपासण्या अगदी मोफत होतात. अगदी चष्मे वाटपही मोफत केले जाते. अलीकडील काळामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाना त्यांच्या मुलाबाळांना उच्चदर्जाचे शिक्षण मिळावे या हेतून फर्स्ट स्टेप या इंग्रजी शाळेची उभारणीही नगरसेविका अपर्णा शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौंडेशन ने केली आहे यामध्ये आधुनिक सी बी एस सी माध्यमातून शिक्षणाची सोया उपलब्ध करून दिली गेली आहे. अशा प्रकारे मिरज मध्ये सामाजिक शेक्षणिक आणि वैद्यकीय अशा सर्व आघाडीवर पद्मावती शांतीसेवा फौंडेशन ची घोडदौड सुरु आहे.










