• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विठ्ठलवाडीतून दोन बालमजुरांची सुटका

by
March 1, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

ठाणे: विठ्ठलवाडी परिसरातील एका बॅग बनविणाऱ्या कारखान्यावर टाकलेल्या धाडीत दहा ते बारा वर्षे वयोगटातील दोन बालमजुरांची सुटका करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल १६-१६ तास काम करून घेतले जात असल्याचे समोर आले आहे.

ठाणे जिल्ह्यात बालहक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘प्रथम’ संस्थेच्या सर्वेक्षणातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर कामगार विभागाने तातडीने कारवाई करत संबंधित कारखान्यावर छापा टाकला. याप्रकरणी संबंधित कारखानदारावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कल्याण कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

RelatedPosts

खुडूस केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख अनिल पवार यांचे स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

अधिक मासानिमित्त महिलांसाठी अक्कलकोट दर्शन यात्रा; डॉ. सुनिताताई पोटे यांचा उपक्रम

कल्याण, विठ्ठलवाडी तसेच उल्हासनगर येथे मोठ्या संख्येने कपडे, बॅग तसेच अनेक वस्तू बनविण्याचे लहान मोठे कारखाने आहेत. याठिकाणी परराज्यातून आलेले अनेक मजूर कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘प्रथम’ संस्थेने विठ्ठलवाडी परिसरात लहान बालकांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले होते. याच दरम्यान श्रीराम चौक येथे एका बॅग बनविणाऱ्या कारखान्यात अल्पवयीन मुले काम करत असल्याची माहिती संस्थेला मिळाली. प्रत्यक्ष पाहणीअंती ही बाब गंभीर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संस्थेने विलंब न लावता कल्याण येथील कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. बालमजुरीसारख्या विषयाची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.

कामगार विभागाच्या पथकाने संबंधित कारखान्यावर धाड टाकत तपासणी केली असता दहा ते बारा वर्षे वयोगटातील दोन मुले काम करताना आढळले. या मुलांची सुटका करून त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. या मुलांकडून दररोज तब्बल १६ तास काम करून घेतले जात होते. अपुरी विश्रांती, शिक्षणापासून दुरावलेले जीवन आणि बालपणावर पडलेले श्रमाचे सावट यामुळे हा प्रकार अधिकच गंभीर ठरतो.

सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलांना लवकरच बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी समुपदेशन, शैक्षणिक पुनर्स्थापना आणि आवश्यक त्या सामाजिक सहाय्याच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन तसेच संबंधित संस्था प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून पुढील योग्य दिशा निश्चित करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

Previous Post

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बाभूळगाव येथे आढावा बैठक

Next Post

कोकणासाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय : M2M रो-रो सेवा मुंबईहून विजयदुर्गकडे रवाना

Related Posts

Blog

खुडूस केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख अनिल पवार यांचे स्वागत

June 17, 2026
16
Blog

शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

June 17, 2026
3
Blog

अधिक मासानिमित्त महिलांसाठी अक्कलकोट दर्शन यात्रा; डॉ. सुनिताताई पोटे यांचा उपक्रम

June 17, 2026
0
Blog

ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत; शिरूर नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम

June 17, 2026
6
Blog

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026
14
Blog

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026
39
Next Post
कोकणासाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय : M2M रो-रो सेवा मुंबईहून विजयदुर्गकडे रवाना

कोकणासाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय : M2M रो-रो सेवा मुंबईहून विजयदुर्गकडे रवाना

ताज्या बातम्या

खुडूस केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख अनिल पवार यांचे स्वागत

June 17, 2026

शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

June 17, 2026

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In